पगार येतो, पण महिना संपायच्या आधीच संपतो. अचानक कुठला ना कुठला खर्च निघतोच. कर्ज फेडायला घेतलेलं कर्ज पुन्हा वाढतं. हे नुसतं नशीब नाही, कुंडलीत याची कारणं दिसतात.
बऱ्याच कुंडल्यांत कमाईचं स्थान चांगलं असतं पण खर्चाचं स्थान जास्त बलवान असतं. म्हणून पैसा येतो पण टिकत नाही. हे कळलं की काय करायचं तेही ठरवता येतं.
कोणतंही रत्न रातोरात पैसा देत नाही. जो कुणी असं सांगत असेल त्याच्यापासून लांब राहा. रत्न फक्त कमजोर ग्रहाला बळ देतं, बाकी मेहनत तुमचीच.